दि. ४ फेब्रुवारी २०१८ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय महाअधिवेशनात
समाजातील अनिष्ट प्रथांविषयी चर्चा होऊन खालील ठराव मंजूर करण्यात आले.
- लग्न समारंभ साध्या पद्धतीने करावेत व अनावश्यक खर्च टाळावा.
- विवाहात बँड, डीजे, फटाके यांचा वापर टाळावा.
- साखरपुडा कार्यक्रम साध्या पद्धतीने करावा.
- मुलांकडून मुलींसाठी साडी देण्याची प्रथा बंद करावी.
- वारल्यानंतर साडी-चोळी देण्याची प्रथा बंद करावी.
- प्रत्येक लग्नामध्ये पंचायतच्या नावाने किमान ₹२५० देणगी पावती फाडावी.
- लग्नात रुबाबदार दरवाजे, स्टेज यांची प्रथा बंद करावी.
- मंडळातील सर्व भाऊबंदांनी एकोप्याने कार्यक्रम करावा.
- सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून खर्च वाचवावा.
- ढोल-ताशा व मोठ्या जेवणावळीची अपेक्षा टाळावी.
- लग्नानंतर सत्यनारायण पूजेसाठी वधूपक्षाकडून लोक नेण्याची प्रथा बंद करावी.
- मुलींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावरून जाताना तोंडावर स्कार्फ बांधू नये.
चौथ्या महाअधिवेशनात मंजूर झालेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आपण ठरविले आहे.